शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तडीपारीच्या विक्रमानंतर आता मोक्कातही शतक : सातारा पोलिसांची डबल धमाका कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 22:47 IST

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण

सातारा : जिल्ह्यातील खून, दरोडा, सावकारी, खंडणी, जबरी चोरी, मटका-जुगार चालवणारे, बेकायदा दारूविक्री आदी गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शंभरपेक्षा जास्त जणांना तडीपार केले. त्यानंतर आता १३ टोळ्यांमधील १०२ जणांवर मोक्का कारवाई करत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवार्इंची डबल सेंच्युरी पूर्ण केली आहे.

सातारा जिल्ह्यातील दहशत करून बेकायदा आर्थिक फायदा करणारे, बेकायदेशीर कृत्ये करणारे, अवैध खासगी सावकारी करणारे सराईत गुन्हेगार, मारामारी, खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी करणाऱ्या १३ टोळ्यांवर सर्व पोेलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यामार्फत मोक्काचे प्रस्ताव पाठवले होते. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी १३ प्रस्तावातील १०२ जणांना मोक्का कारवाईस मंजुरी दिली आहे.

यामध्ये २०१६ मध्ये जबरीचोरी गुन्हेगारांच्या १ टोळीमधील ६, २०१७ मध्ये दरोडा टाकून दहशत माजवून मारहाण करत जबरदस्तीने वसुली करणारे ९ टोळीतील ६७ आरोपींवर व २०१८ मध्ये ३ दरोडे टाकून खून करून जबरी चोरी, सावकारीच्या व्याजासाठी दहशत करून वाहने जबरदस्तीने चोरून घेऊन जाणाºया टोळ्यांमध्ये २९ आरोपींवर मोक्का लावण्यात आला. त्यामध्ये रॉयल ऊर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा, प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर, महेंद्र तपासे, अमित ऊर्फ सोन्या देशमुख, आकाश ऊर्फ बाळू खुडे, शेखर गोरे, आशिष जाधव, अनिल कस्तुरे, चंद्रकांत ऊर्फ चंदर लोखंडे, अमित ऊर्फ बिºया कदम, रुकल्या दशरथ, बाळू ऊर्फ विनोद खंदारे यांच्या टोळीतील १०२ सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

विश्वास नांगरे-पाटील व संदीप पाटील हे हजर झाल्यापासून जनतेतून सावकारी करणारे, खून, जबरीचोरी करणाºया लोकांवर जनतेमधून कारवाईची मागणी होत होती. त्यामुळे जिल्ह्यातून तडीपार करून शतक पूर्ण केल्यानंतर आतापर्यंत १०२ लोकांवर मोक्का अन्वये कारवाईचे शतक पूर्ण केले. येवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.जिल्ह्यातील क्राईम रेट आला खालीसातारा शहरासह जिल्ह्यात बेकायदा दारू, मटका चालवणारे, खासगी सावकारी करणाºया टोळ्या व्यापारी, वाहन चालक व महिलांना १० ते २० टक्के व्याज दराने पैसे देत होते. त्यांनी धमकावणे, मारहाण व अपहरण करत दहशतीने वाहने, जमिनी व घरे स्वत:च्या अगर इतरांच्या नावे करत कोट्यावधी रुपयांची संपत्ती गोळा केली होती. त्यामुळे जिल्ह्याचा क्राईम रेट वाढला होता. यासाठी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपारी आणि मोक्काचे हत्यार उपसले. प्रतिबंधक कारवायांमुळे अनेकजणांना जेरबंद तर काही फरार झाल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया कमी झाल्या आहेत.